Tuesday 7 June 2011

काहीही बोल पण बोल

घरी असताना संदेश पाठवू नकोस अस सांगितल्यामुले आज सकाळी संदेश पाठविला नाही. कामावर लवकर गेली, म्हणजे आमच सकाळी बोलण होणार नाही हे मी समजून गेलो. तरीही नेहमीच्या वेळेला मी कॉल केला तिच्या लगेच संदेश आला, " मैत्रिण बरोबर आहे " मी म्हंटल ती नसताना १ मिनिट तरी बोल अस उत्तर दिल. ४ कॉल केलेच पण काही उपयोग झाला नाही. थोड्या वेळाने संदेश पाठविला त्यात म्हणालो, " का नाही रागवलिस माझ्यावर ? रागव, काहीही बोल, बडबड मला, पण अशी गप नको राहूस. पूर्वी बोलायचिस तसीच बोल, घरी असताना सुद्धा संदेशद्वारे बोल. अस केलस तरच मी समजेन तू मला मनापासून माफ केलस म्हणून, तुझ्या प्रतिसादची वाट बघतोय." सकाळपासून संदेश पाठविले. अखेर संध्याकाळी तिने उत्तर दिल. पण माफ केलय अस नमूद केल नव्हत. खर तर तिने मला अपेक्षित असलेल उत्तर दिलच नाही. मी पण आग्रह धरला नाही. आज संध्याकाळी लवकर घरी आली होती. बोलताना जरी ती मला माफ करीत असली तरी घरी गेल्यावर वागताना तिची नाराजी लगेचच जानूण येते. कदाचित उदया सुद्धा मला अशीच तिचा आवाज ऐकू देणार नाही वाटत.    

No comments:

Post a Comment